भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मते "विद्यार्थी हे सक्षम भारताचा पाया आहेत" या प्रेरणादायी विचारातून प्रेरणा घेत, वेंकटेश फाउंडेशन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने फाउंडेशन विविध प्रकारचे शैक्षणिक सहाय्य, संधी आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देते. या उपक्रमांमुळे फाउंडेशनच्या पाठबळाने अनेक विद्यार्थी आज शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.
शैक्षणिक सहाय्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून आर्थिक साक्षरता, व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कारमूल्यांची जपणूक करण्यावरही फाउंडेशन विशेष भर देते. विविध स्पर्धा, प्रशिक्षण कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि कलागुण विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची संधी दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे समाजाची अमूल्य संपत्ती म्हणून पाहत, भविष्यात कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे सक्षम नेतृत्व घडविण्याचे कार्य फाउंडेशन करत आहे. समाजाच्या सातत्यपूर्ण सहकार्याने हे अभियान आणखी व्यापक होऊन अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि यशाची नवी संधी मिळू शकते.